कायम विद्यार्थी असावे

चक्रव्युहात अडकलेल्या अभिमन्यूला कौरवांनी कपटाने मारले. यात पुढे असलेल्या जयद्रथाचा दुसऱ्या दिवशी सूर्यास्ताच्या आधी वध करण्याची प्रतिज्ञा अर्जुनाने केली. तेव्हापासून जयद्रथ घाबरला. कौरव गटात जयद्रथाला संध्याकाळ पर्यंत वाचवायचे कसे यावर चर्चा सुरू झाली.

द्रोणाचार्य सेनापती होते. तेच अर्जुन आणि जयद्रथाचे गुरु देखील होते.
घाबरलेला जयद्रथ रात्री द्रोणाचार्यांच्या तंबूत गेला आणि त्याने द्रोणाचार्यांना विचारले की मी अर्जुनाला कसा हरवू शकतो?

द्रोणाचार्यांनी सांगितले की तुला जिवंत रहायचे असेल तर उद्या अर्जुनासमोर जाऊ नकोस. उद्या त्याला थोपवायचं कसं ते आम्ही पाहू. द्रोणाचार्यांच्या उत्तराने व्यथित झालेला जयद्रथ म्हणाला “गुरुजी मी आणि अर्जुन आम्ही दोघेही तुमचे शिष्य. जशी त्याने धनुर्विद्या तुमच्याकडून शिकली तशीच मीही तुमच्याकडूनच धनुर्विद्या शिकलो. मग असं काय झालं की आज तो सर्वश्रेष्ठ धनुर्धर आहे आणि मला त्याच्यापासून लपावं लागत आहे?

द्रोणाचार्यांनी सांगितलं जयद्रथा, तुम्ही दोघेही माझे शिष्य. मी दोघांनाही समभावानेच शिकवलं. पण तू मी शिकवले ते अंतिम मानून सराव करायचास आणि अर्जुन मी शिकविले ती सुरुवात मानून सराव करायचा. तो त्याच्याबद्दल प्रश्न विचारायचा, खोलात जायचा, प्रयोग करायचा, त्याचं कधी समाधान व्हायचंच नाही.

माझ्याकडील शिक्षण झाल्यावर तू पूर्णपणे राज्यकारभारात गुंतलास. पण अर्जुन इतर अनेक गुरूंकडून शिकतच गेला. नवनवीन अस्त्रे आपल्या भात्यात समाविष्ट करत गेला.
थोडक्यात अर्जुन श्रेष्ठ आहे कारण त्याची शिकण्याची आणि सरावाची जिज्ञासा वाढत गेली आणि तुझी शिकण्याची इच्छा कमी कमी होत गेली.
आता आपण ज्याच्यासोबत लढत आहोत तो अर्जुन माझा विद्यार्थी काही काळासाठी होता…पण तो धनुर्विद्येचा विद्यार्थी कायमचा आहे.

ज्याने शिकणं संपवलं तो संपलाच म्हणून समज !…

म्हणून मित्रहो, आपण कोणत्याही वयाचे असो आपण कायम विद्यार्थी असणे महत्वाचे..सतत काही ना काही शिकत राहिले पाहिजे 👍

(संकलन – श्याम धारासूरकर, Librarian उरण महाविद्यालय, उरण )
लायब्ररी हेल्पलाईन नंबर- 9892798322

(Please visit library-blog for more articles )

OpenAI आणि बटणाचा वापर

OpenAI ने नुकताच एक मोठी अपडेट जाहीर केली. त्यांनी काही अँप्स थेट चॅटजीपीटी मध्ये समाविष्ट केले आहेत. canva , spotify सारख्या अँप्स बरोबर आता थेट चॅटजीपीटी मधूनच काम करता आहे येणार आहे.

हे अँपल आणि गुगल यांच्या अँप्स स्टोअर साम्राज्यासाठी मोठं आव्हान आहे. या दोन्ही कंपन्या अँप स्टोअर मधून बक्कळ पैसे कमवत आहेत. ते मार्केट OpenAI आता स्वतःकडे खेचत आहे.

पण एका वेगळ्या गोष्टीकडे तुमचं लक्ष वेधून घ्यायचं आहे –
अँप स्टोअर आणि चॅटजीपीटी स्टोअर मध्ये एक मूलभूत फरक आहे. अँप स्टोअर ऍप्समध्ये ढवळाढवळ करत नाहीत. चॅटजीपीटी मात्र अँप स्टोअर कसे वापरायचे हे ठरवत आहे. अँप मध्ये वेगवगेळी बटणे दाबण्यापेक्षा आता थेट तुम्ही अँप्स सोबत ChatGPT मार्फत बोलू शकता.

AI बऱ्याच गोष्टी नष्ट करत आहे. पण त्याचा पहिला घाला पडतोय तो बटणांवर. तो दिवस दूर नाही जेव्हा सर्व ऍप्सची सर्व बटणे निघून त्याजागी केवळ चॅट बॉक्स असेल. हळूहळू बटणे ऍप्स मधून जातील. मग हळूहळू अँप्स फोन मधून जातील. कोणतेही विशिष्ट अँप ओपन करण्याऐवजी आपण फोनबरोबर चॅट करून पाहिजे ते काम करून घेऊ शकतो.

पण हे इथेच थांबणार नाही. हळूहळू फोनची देखील आवश्यकता राहणार नाही. काही टाईप करण्याची आवश्यकता राहणार नाही. मोबाईल स्क्रीन डोळ्यावरील चष्म्यामध्ये येईल. आपण केवळ आवाजाने किंवा हातवारे करून ते नियंत्रित करू शकू.

स्टिव्ह जॉब्स ने जेव्हा झेरॉक्सच्या लॅब मध्ये कम्प्युटर माउस पहिला. तेव्हा त्याने ती कल्पना लगेच चोरली. असंख्य बटणांऐवजी आता केवळ तीन बटनांवर संगणक वापरता येईल आणि त्यामुळे जास्तीत जास्त लोक संगणक वापरतील हे त्याने हेरले. पुढे स्मार्ट फोनमध्ये पण त्याने तेच केले. नोकिया किंवा ब्लॅकबेरीच्या फोनमधील बटणेच काढून टाकली. ज्यांना फोन वापरणे किचकट वाटत होते अचानक फोन त्यांच्यासाठी सोपा झाला.

Open AI चा सॅम अल्टमॅन किंवा मेटा चा मार्क झुकरबर्ग आता तेच करू पाहत आहेत. आपल्याला मशीन बरोबर बोलता यावं म्हणून तयार झालेली बटणं . आता आपल्याला थेट मशीन बरोबर बोलता येतंय म्हणून पहिला जॉब या बटणांचाच जाणार आहे !!

(संकलन – श्याम धारासूरकर, Librarian, उरण महाविद्यालय उरण )
लायब्ररी हेल्पलाईन नंबर 9892798322
(Please visit library-blog for more articles )